२ एप्रिल घटना
-
२०११: — क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने २८ वर्षांनंतर विजय मिळवला.
-
१९९८: — कोकण रेल्वेवरून धावणारी निजामुद्दीन तिरुअनंतपुरम राजधानी एक्स्प्रेस या गाडीचा प्रारंभ झाला.
-
१९९०: — स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.
-
१९८४: — सोयुझ टी-११ या अंतराळयानातून राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. ते ७ दिवस २१ तास ४० मिनिटे अवकाशात होते.
-
१९८२: — फॉकलंडचे युद्ध - अर्जेंटिनाने फॉकलंड बेटे पादाक्रांत केली.
-
१८९४: — छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
-
१८७०: — गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.