२० ऑगस्ट घटना
-
२००८: — कुस्तीगीर सुशील कुमार यांनी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ पदक जिंकले.
-
१९९५: — भारतातील फिरोजाबाद रेल्वे अपघातात २५८ जणांचा मृत्यू झाला.
-
१९८८: — ८ वर्षांच्या युद्धानंतर इराण-इराक युद्धबंदी करार झाला.
-
१९६०: — सेनेगलने आपण मालीपासून स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
-
१९४१: — दुसरे महायुद्ध फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली
-
१९२०: — डेट्रॉइट,मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.
-
१९१४: — पहिले महायुद्ध - जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
-
१८९७: — सर रोनाल्ड रॉस यांनी भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
-
१८२८: — राजाराममोहन रॉय, द्वारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
-
१६६६: — शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी नरवीर घाटी हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.