२००१:— गुजरातमधील कच्छ भागात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे २०,००० लोक ठार झाले.
१९९८:— कॅप्टन लक्ष्मी व उषा मेहता यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान.
१९७८:— महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा सुरू.
१९६५:— भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.
१९५०:— एच. जे. कनिया यांनी भारताचे पहिले सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४९:— भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.
१९४२:— दुसरे महायुद्ध अमेरिकन फौजांचे युरोपातील नॉर्दन आयर्लंड येथे आगमन.
१९३३:— भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सूरुवात केली.
१९२४:— रशियातील सेंट पीट्सबर्गचे लेनिनग्राड असे नामकरण करण्यात आले.
१८७६:— मुंबई आणि कलकत्ता दरम्यान रेल्वे वाहतुकीस सुरूवात झाली.
१८३७:— मिचिगन हे अमेरिकेचे २६ वे राज्य बनले.
१६६२:— लोहगड-विसापूर आणि तिकोना या किल्ल्यांच्या परिसरात मुघल फौजांच्या चढाया.
१५६५:— विजयनगर साम्राज्य आणि दख्खनचे सुलतान यांच्यात तालिकोटा येथे लढाई झाली. या लढाईत रामरायाचा पराभव होऊन दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.