जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — जेव्हा तुम्ही आयुष्यातील सामान्य बाबतीत असामान्य यश मिळवाल तेव्हा साऱ्या जगाची लक्ष तुमच्यावर केंद्रित झालेले असेल (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन कार्वेर)
सुविचार — स्थिर बुद्धीचे व्हा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पवित्र व्हा व स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक रहा भविष्यावर श्रद्धा ठेवा तुमच्याजवळ पैसा नसल्यामु… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
जन्म - १६ एप्रिल १९३४ — राम नाईक — भारतीय राजकारणी आणि केंद्रीय मंत्री
सुविचार — जेव्हा तुम्ही आयुष्यातील सामान्य बाबतीत असामान्य यश मिळवाल तेव्हा साऱ्या जगाची लक्ष तुमच्यावर केंद्रित झालेले असेल (लेखक: जॉर्ज वॉशिंग्टन कार्वेर)
सुविचार — स्थिर बुद्धीचे व्हा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे पवित्र व्हा व स्वतःशी पूर्णपणे प्रामाणिक रहा भविष्यावर श्रद्धा ठेवा तुमच्याजवळ पैसा नसल्यामु… (लेखक: स्वामी विवेकानंद — जन्म: १२ जानेवारी १८६३ | निधन: ४ जुलै १९०२)
२००१:— भारत व व्हिएतनाम दरम्यान सांस्कृतिक, पर्यटन आणि अणूऊर्जेचा शांततेसाठी वापर करण्याच्या तीन करारांवर सह्या झाल्या.
२०००:— लता मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
१९६३:— लिओनार्डो डा व्हिन्सि यांच्या मोनालिसाचे अमेरिकेत प्रथमच नॅशनल गॅलरी ऑफ आर्ट, वॉशिंग्टन येथे प्रदर्शन करण्यात आले.
१९५७:— गोव्याच्या लष्करी न्यायालयात मोहन रानडे यांच्यासह तेवीस जणांना २४ वर्षांची शिक्षा झाली.
१९४७:राजस्थान विद्यापीठ— सुरवात.
१९४०:दुसरे महायुद्ध— ब्रिटनने अन्नधान्यावर नियंत्रण (रेशनिंग) आणले.
१८८९:— संख्यात्मक सामग्रीचे विश्लेषण करण्यासाठी डॉ. हर्मन होलरिथ यांना अमेरिकेत गणकयंत्राचे पेटंट मिळाले.
१८८०:— सत्यशोधक समाजाच्या संस्काराने लावलेली लग्ने कायदेशीर असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय. ब्राम्हणेतर लोकही लग्नाचे पौरोहित्य करु शकतात हे न्यायालयाने मान्य केले.
१८३५:— अमेरिकेवरील राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदाच आणि एकदाच शून्य झाले.