घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
सुविचार — जे शक्तिशाली असून सुद्धा क्षमा करतात आणि दरिद्री असूनही दान करतात असे पुरुष स्वर्गाच्या ही वर असतात (लेखक: भगवान महावीर)
सुविचार — राक्षसी सामर्थ्य असणे हे चांगले असले तरी ते सामर्थ्य एखाद्या राक्षसाप्रमाणे वापरणे म्हणजेच जुलूम करणे (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
घटना - १६ एप्रिल १९४८ — राष्ट्रीय छात्र संघाची (NCC) — सुरवात.
सुविचार — जे शक्तिशाली असून सुद्धा क्षमा करतात आणि दरिद्री असूनही दान करतात असे पुरुष स्वर्गाच्या ही वर असतात (लेखक: भगवान महावीर)
सुविचार — राक्षसी सामर्थ्य असणे हे चांगले असले तरी ते सामर्थ्य एखाद्या राक्षसाप्रमाणे वापरणे म्हणजेच जुलूम करणे (लेखक: विल्यम शेक्सपियर — जन्म: २३ एप्रिल १५६४ | निधन: २३ एप्रिल १६१६)
२००३:— शांघाय ट्रान्सरॅपिड या प्रवासी रेल्वेने ५०१ किमीतास या वेगाने जाण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
२०००:— १२ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय सार्वजनिक प्रसारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१९९८:— परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना व्हिसाशिवाय मायदेशी येण्याची सुविधा देणारी पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजीन (PIO) ओळखपत्र योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी जाहीर केले.
१९९७:— १९९३ च्या जागतिक व्यापार केंद्रावर बॉम्बफेक करणारे रमोजी युसेफ दोषी ठरले.
१९९०:— टिम बर्नर्स-ली यांनी वर्ल्ड वाइड वेबसाठी औपचारिक प्रस्ताव प्रकाशित केला.
१९५६:— मोरोक्को, सुदान आणि ट्युनिशियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९४५:— पुण्यात महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांची राजकीय परिस्थितीवर साडेदहा तास चर्चा झाली.
१९३०:— पहिल्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
१९२७:— सोविएत कम्युनिस्ट पक्षातुन लिऑन ट्रॉटस्कीची हकालपट्टी करण्यात आल्यामुळे जोसेफ स्टॅलिनच्या हातात सर्व सत्ता गेली.
१९१८:— ऑस्ट्रिया प्रजासत्ताक बनले.
१९०५:— नॉर्वेच्या जनतेने सार्वमतात प्रजासत्ताक होण्याऐवजी राजसत्ताच कायम ठेवण्याचा कौल दिला.